पहिल्या अखंड मराठी रेडीओचा लाभ घ्या.

अस्मिता (संदीप खरे)

शब्दांना वेळीच सावरले म्हणून बरे झाले
नाहीतर शब्द भलतेच बोलून गेले असते.
शब्दांना माघारी बोलावले म्हणून बरे झाले
नाहीतर शब्द छेद करून पार गेले असते
शब्द तरुण... बंदुकीतल्या दारूसारखे ज्वालाग्राही
अस्मितेच्या खाली पोट असते, हे त्यांना माहीत नाही.
- दत्ता हलसगीकर ("आषाढघन' काव्यसंग्रहातून)

शब्द, शब्द आणि शब्द.... जन्मापासून अवतीभवती उमटणारे शब्द... जन्माच्या अंतापर्यंत गिरगिरणारे, भिरभिरणारे शब्द! पावसासारखे शब्द, चांदण्यासारखे शब्द, फुलांसारखे शब्द, निखाऱ्यांसारखे शब्द, ज्वालामुखीसारखे शब्द! जग बेचिराख करणारी युद्धं मांडणारे शब्द, रणांगणावर तत्त्वज्ञानाची कैलासशिखरे होणारे शब्द! ऐकावत असे शब्द, कानावरसुद्धा नकोत, असे शब्द! अतिपरिचयाने मोल हरवलेले शब्द!

कितीजणांनी किती प्रकारे गौरविलेले शब्द! तुकोबा म्हणतात - आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे। यत्नें करू।।
दत्ताजींची कविता सुरवातीला बोलते आहे ती शस्त्र होऊ पाहणाऱ्या या शब्दांविषयीच! त्यांना जाणवली आहे शब्दांची असीम दाहकता, त्यांचा स्फोटकपणा, विखार, कापत-जाळत जाण्याची त्यांची ताकद!

बेचिराख जर्मनीला अभिमानानं उभं करून साऱ्या जगाला वेठीला धरणाऱ्या हिटलरनं वापरले ते हेच शब्द- आणि बॉंबहल्ल्यात सारं लंडन उद्‌ध्वस्त होत असताना ब्रिटिशांना निर्धारानं उभं ठेवणाऱ्या चर्चिलनं वापरले ते हे शब्दच!

आणि इतकं लांब कशाला- अगदी रोजच्या जगण्यातही आपण पाहतोच की! सुरेश भट म्हणतात तसं, एका शब्दासाठी आयुष्य तारण ठेवणाऱ्या जुन्या मातीच्या माणसांविषयी आपण ऐकलं असेल. कुठल्याही दडपशाहीला न जुमानता ब्रिटिशांची झोप उडवणारे बॉंबहूनही हाहाकार करणारे शब्द लिहिणारे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची उदाहरणं देशोदशींच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. त्यासाठी संसाराची राख कपाळाला लावून बाहेर पडलेली ही माणसं!

पण हे तेज, हे सामर्थ्य साऱ्यांना पेलवेल? शब्दाची ताकद जोखलेल्या या कवितेच्या पोटी हीच तर आशंका आहे. ती ओळखते, की एका क्षणात रक्ताची नाती आणि जन्माचे मैत्र तुटून जावे, अशी ताकद या शब्दांत आहे! सामान्य आयुष्यात, व्यवहारात कितीदा तरी अनुभवलेले हे प्रसंग! म्हणून तर या शब्दांची मनात कुठंतरी धास्ती आहे! सावरलं नाही तर शब्द भलतंच बोलून बसतात. ओठांवरून वेळीच माघारी बोलावलं नाही तर आरपार निघून जातात! शब्द चिरतरुण असतो... शब्दाचे काहीच बिघडत नसते, बिघडत असते ते एकमेकांना धरून धरून जगण्याचा, तोल सांभाळत राहिलेल्या तुमचं-आमचं!
"दहा हजार गाई' या दि. बा. मोकाशींच्या कथेची आठवण होते. रिटायरमेंटला काहीच दिवस उरलेले आणि पैशांची गरज असलेला एक म्हातारा. त्याचे वरिष्ठ त्याला सतत टोचून बोलतात! त्यांना उलट सुनावण्याचं सतत मनात येतं त्याच्या, पण होतं असं, की काही बोलायला जावं, त्याच वेळी खिडकीतून एक चेहरा त्याला दिसतो. कुणाचा कुणास ठाऊक; पण त्याच्या शांत काळ्याभोर डोळ्यांत पाहताना राग थिजून जातो- ओठांवरचा बंडाचा शब्द मागे फिरतो! दर वेळेस असं होतं आणि अखेर म्हातारा "यशस्वीपणे' रिटायर होतो! त्याला हव्या असलेल्या दहा हजार गाई (रुपये) त्याच्या पदरी पडतात. मला वाटतं, हा चेहरा संयमाचा! अस्मितेच्या खाली पोट असतं, ते सांगणाऱ्या सर्वसामान्यांना झेपणाऱ्या शहाणपणाचा! असामान्यांचे शब्द सामान्य ओठांना पेलावेत कसे? कितीही खरं असलं तरी जगण्याच्या चौकटीत मावावेत कसे? म्हणून तर मग शब्द "सावरले' जातात. "माघारी बोलावले' जातात. तारुण्याच्या अस्मितेत स्वैर वाहणारे शब्द पोटाच्या किनाऱ्याला लागतात, तेव्हा वेगळेच बोलू लागतात.
साऱ्याच स्वतंत्र विचाराच्या विचारवंतांना, शास्त्रज्ञांना, प्रतिभावंतांना, कलाकारांनाही हे पोट काही चुकले नाही; मग सामान्य माणसाविषयी तक्रार ती काय? आता यातून कोण कशी वाट काढतं, हा ज्याच्या-त्याच्या वकुबाचा प्रश्‍न. कुणी झगडतं, उद्‌ध्वस्त होतं, कुणी वेगळी वाट काढतं, कुणी "मध्यम मार्ग' निवडतं, तर कुणी "धोपटमार्गी' शरण जातं! मिर्झा गालिबच्या ज्वलंत गझलांमध्ये कधीतरी मधूनच बादशहाची मर्जी राखण्यासाठी खास त्याच्या स्तुतीपर एखादा शेर येतो, एखादा कसिदा लिहिला जातो आणि मग या आणि अशा अनेक प्रतिभावंतांचा रसिक म्हणून आपल्याला रागही येतो आणि माणूस म्हणून कुठंतरी वाईटही वाटतं! ही नियतिशरणता, की हे जगण्याचं तत्त्वज्ञान? ही अपरिहार्यता की अगतिकता? ग. दि. माडगूळकरांचं एक गीत आहे- "गीत हवे का गीत?'.. मला तर त्या शीर्षकापासून कवितेतही या वस्तुस्थितीचाच कडवट उपरोध जाणवतो! मग मनात असूनही मनातला शब्द काही बाहेर फुटत नाही. शब्दांचे बाण प्रत्यंचेवर चढण्याआधीच भात्यात परत जातात! ही शोकान्तिका म्हणावी की एका अर्थानं जगण्याची समतोलता? नियतीनं माणसाला अस्मिताही दिली, पोटही दिलं. अगदी सहज वापरता येतील असे हजारो शब्द दिले आणि प्रत्येकामागं लावून दिली जगण्याची एक अखंड तारांबळ! या विनोदाची जात कुठली?

म्हणूनच तर निदा फाजलींसारखा प्रतिभावंत शायर विषादाच्या कुण्या एका क्षणी लिहून गेला असेल...
"मीर-ओ-गालिब के शेरों ने किस का दिल बहलाया है?
सस्ते गीतों को लिख लिखकर हमने घर बनवाया है।'

तू कुठे आहेस गालिब? (संदीप खरे)

गालिब कधी भेटला आठवत नाही. भेटल्यावरती लगेच कळला, पटला, भावला असं मुळीच नाही. त्याच्या समुद्रातला थेंबभरही तो कळला असं अजूनही वाटत नाही. पण पूर्वपुण्याईनं म्हणा तो कधीतरी कुणाकडून तरी ऐकला, कुठंतरी वाचला. शनिवारात जन्म घेतलेल्या माझी त्याच्याशी ओळख व्हावी, हे माझं भाग्य! त्यापूर्वी "अंधारात दिवा लगाओ वरना, धाडकन जिन्यावर पडोगे, गालिब' असल्या चहाटळपणात हा "गालिब' साथ द्यायचा. काहीही शायरी वगैरे असली की गालिब असतो एवढं ठाऊक होतं. "हनिमून एक्‍स्प्रेस' नावाच्या चित्रपटात शायरीशी अजिबात अनोळखी असलेल्या (आणि तरीही असलेच चहाटळ शेर जुळवणाऱ्या) बोम्मन इराणीला शबाना आझमी शेवटी हसून सांगते- "सभी शेर गालिब के नही होते।' आणि वर त्या गालिब या नावाचा खास नुक्ता असलेल्या "ग़ालिब' असा उच्चारही शिकवते! "ग़ालिब' हा उच्चारही अस्खलित करणं मराठी कंठाला थोडं कठीणच! पण टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाइट जमान्यात कुठल्यातरी कार्यक्रमात "ग़ालिब'ची शायरी आणि त्यावरची चर्चा, निरूपण असंच कुठल्यातरी उर्दू शायरातोंडून तिसरी-चौथीत असताना ऐकली. मुळात उर्दू भाषाच कानाला गोड गुंगी आणणारी! कोणी छान उर्दू बोलायला लागलं की वाटतं "राहू द्या हो तो अर्थ वगैरे बाजूला... आधी तासभर नुसतं बोलत राहा काहीतरी!' सांगायचा मुद्दा, की त्या कार्यक्रमात त्या वयातही मनात "गालिब' नावाची शम्मा थोडी रोशन झाली! आणि मग तो पुढे कुठं न कुठं भेटत राहिला. लेखांतून, पुस्तकांतून (अगदी चित्रपटातील गाण्यातूनही)! पुढे गुलजारांची "ग़ालिब' सिरीयलही भेटली! एक दिवस तर त्याचा "दिवान' (शायरीचा संग्रह) हाती आला. शब्दांचे अर्थ लावून वाचता वाचता जाणवू लागलं, की "हजारो ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पें दम निकले' असं लिहिणारं हे प्रकरण एव्हरेस्टपेक्षा उंच आणि पॅसिफिकपेक्षा गहिरं आहे! हा जन्मच नाही, पुढचे सगळे जन्म पुरून उरणारं आहे!

आपल्या प्रदीर्घ आयुष्यात जीवनाचे सगळे गदारोळ बघितलेला हा शायर. नाना अडचणी, संकटं, कौटुंबिक कलह, स्वत:च्या 7 अपत्यांचे मृत्यू, समकालीन शायरांसोबतचे कलह, शेवटची घरघर लागलेल्या मुगल खानदानाची राजकारणं, कर्जबाजारीपणा, जुगार आणि त्यापायी घडलेली तुरुंगयात्रा, मद्याचं अनिवार आकर्षण.. एक ना दोन! "ग़ालिब'चं सगळं चरित्र म्हणजे दु:ख आणि वेदनांची होरपळ आहे! आणि तरीही रोज मद्याचा पेला शेजारी ठेवून "मुश्‍किलें मुझ पर पडी इतनी के आसॉं हो गयी।' असं म्हणणारी असामान्य, लखलखती प्रतिभा। मिर्झाजींची लिखाणाची पद्धतही आगळीच! रोज रात्री मदिरेसोबत शायरी चालू असताना एक शेर सुचला, की साहेब हातातल्या रुमालाला एक गाठ बांधायचे. रात्रभर रुमालाला अशा गाठी पडत राहायच्या. आणि दुसऱ्या दिवशी एकेक गाठ सोडवून त्या-त्या गाठीसाठी लिहिलेला शेर कागदावर उतरवला जाई! आयुष्याच्या शेवटी "अजीजों अब तो बस अल्लाह ही अल्लाह है' असं म्हणेस्तोवर त्याला सोडून न गेलेली जगातली एकमेव गोष्ट म्हणजे त्याची शायरी आणि शेवटपर्यंत धडधाकट राहिलेलं त्याचं संवेदनशील मन! दु:ख, प्रेम, विरह, खुदा, आस्तिकता, नास्तिकता, सभोवतालची सामाजिक, राजकीय स्थित्यंतरं, पडझड या साऱ्यांची दखल घेणारं.. शेवटपर्यंत विनोद करू शकणारं, कळवळणारं, उसळणारं, रागावणारं, लोभावणारं "जिवंत' मन! आयुष्याला सर्वांगानं कवळू पाहणारं अति हळवं मन!

"सौमित्र'ची ही कविता वाचल्यावर "ग़ालिब' आणि हे संदर्भ कसे झळकून उठले! आठवतं, की कार्यक्रमासाठी दिल्लीला गेलो, तेव्हा बाकी कुठे जाण्याआधी जुन्या दिल्लीमध्ये "बल्कीमारान की पेचीदा सी गलियोंमे' "ग़ालिब'चं घर शोधत गेलो होतो! घराचा "नक्‍शा' काही आता थेट पूर्वीसारखा नाही; पण वास्तू तीच! शांत बसून तिथे "ग़ालिब'चं वावरणं डोळ्यासमोर आणत राहिलो!

तुलना नाही; होऊ शकतच नाही- पण वाटलं, की कसे आपण! छोट्या-मोठ्या दु:खांनी, संकटांनी हेलावून, गदगदून जाणारे चिमुकले "कवि'! जाणवलं, की "ग़ालिब'सारखं अतिसंवेदनशील मन तोलायचं तर त्याला "ग़ालिब'सारखेच जीवनेच्छेचे भक्कम हात हवेत! आयुष्याशी लढायची पोलादी छाती हवी! "घरात पाणी गेलं, लाइट गेले, दाढ दुखत्येय' यापेक्षा जास्त मजबूत कारणं हवीत खुदाशी भांडण्यासाठी! "सौमित्र'च्या शब्दात सांगायचं तर दु:खावर लिहायचं तर आधी "दु:खाइतकं मोठं व्हायला हवं'!

आयुष्याच्या अनेक अंगावर आज आत्यंतिक "कोरडेपण' अंगावर येत असताना "ग़ालिब' अजूनच अस्वस्थ करून सोडतो! हा कोरडेपणा जाणिवांचा, संवेदनांचा, आपल्या घरट्यापुरतं सुखदु:ख मानणाऱ्या संकुचितपणाचा! जगण्याची नाना दु:खं मानगुटीला घेऊन शेवटपर्यंत "सजीवपणे' झगडणाऱ्या, शायरीचा हात धरलेल्या "ग़ालिब'ची आठवण झाली. "कोहिनूर' हिऱ्यासारखा त्याचा एकेक शेर समोर आला, की संवेदना बोथट झालेला, पटकन तलवार टाकून देणारा आमचा "कवीपणा' ओशाळू लागतो! आणि "कवीपणा'च का? आख्खा "माणूसपणा'च ओशाळून जातो! शेवटी संवेदनशीलता ही काय फक्त कलाकाराचीच मक्तेदारी असते!

गालिबच्या घरात टेकून बसलो होतो, तेव्हा चार ओळी सुचल्या होत्या-

चालले होते बरे, होती मजा देवा तुझी
काय ही ग़ालिब होण्याची अशी इच्छा तुझी?
बघ तुझ्या शब्दांतले हे दु:ख आहे ओळखीचे
बाकी ही शैली तुझी! उपमा तुझ्या! भाषा तुझी!!

इतकंच सुचलं.. पुढे आजतागायत काही सुचलंच नाही.. कधी सुचेल ठाऊक नाही... गझल अर्धीच राहिल्येय अजून- तू कुठे आहेस "ग़ालिब'?

----------------------------------
गालिब!
मला काहीतरी झालंय्‌...
समुद्र पाहून
काहीतरी व्हायचं माझ्या छातीत...
शहरातल्या गर्दीत उगाच फिरतानाही
दिशाहीन वाटायचं मला...
संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं...
पण आता,
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड...
आता,
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं...
रात्री बेरात्री ऊर उगाच भरून यायचा...
आता,
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात,
इकडून तिकडे
तिकडून इकडे.
एवढंच काय गालिब!
कविता लिहून झाल्यावर
साधा कागद जरी पाहिला
की चक्क दिसायचं रे झुळझुळताना पाणी...
आता,
कोरड्या पात्रातून चालत पोहोचतो मी
समोरच्यापर्यंत.
एकमेकांची तहान पाहात कसं जगायचं असतं
हे एकदा तरी सांग गालिब!
आता मला तुझ्या वेदनांवर
माझ्या जखमांची मेणबत्ती पेटवू दे...
माझं बोट धरून
घेऊन चल मला कवितेच्या जंगलात पडणारा
पाऊस पाहायला...
तुझ्या गझलांची हरणं
माझ्या डोळ्यांतून मनापर्यंत
उधाण खेळायला सोड...
मधली कोरडी जमीन
शिंगांनी उकरून काढायला सांग त्यांना मात्र...
गालिब!
मला दु:खाइतकं मोठं व्हायचंय्‌...
भोवतालच्या अंधाराला वणवा नाही लागला तरी चालेल
माझ्या शब्दांचे दिवे तरंगताहेत त्यावर
एवढंच मला पाहायचंय...
माझ्या जिवावर पडत चाल्लेल्या
आत्महत्यांच्या गाठी पार करत करत...
मला मरेपर्यंत जगायचंय्‌...
तुझ्यासारखंच...!
मी तुला कधीचा शोधतो आहे
तू कुठे आहेस गालिब?

नव्या शरीरातून
तू कदाचित ऐकतही असशील तुझंच गाणं...
तुझ्याच दु:खाची
तुला कदाचित ओळख नसेल राहिली...
"खुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई ना दे...'
तसा
तू मला भेटतही असशील रोज...
कदाचित,
मी बारमध्ये दारू पिताना
प्रत्येक वेळी माझ्यासमोर झिंगून बसलेला
तूच असशील कदाचित...
कदाचित तू स्वत:च
दारू होऊन रोज पोटात जात असशील माझ्या...

गालिब!
कुणीतरी तुझा शेर ऐकवला
आणि माझ्या तोडून "व्वा' निघालीच नाही...
मी इतका कोरडा होण्याआधी भेट...
अन्‌ भेटल्यावर
नेहमीप्रमाणे माझ्याकडे उधार माग...
मी तुला काहीच देऊ शकणार नाही
म्हणजे मी किती कोरडा झालोय्‌
याची तुला कल्पना येईल...
आता
तू माझा आधार व्हायचंस
मी तुझा नाही...
आणखी कितीतरी शतकं पुरेल
एवढा झंझावात तू ठेवून गेलायस या जगात...
त्यातली फक्त एक झुळूक पुरेल मला
हे संपूर्ण आयुष्य जगायला...

मी तुला कधीचा शोधतोय्‌
तू कुठे आहेस गालिब?

----------------------------------
तू कुठे आहेस गालिब
कवी - सौमित्र
काव्यसंग्रह : ... आणि तरीही मी!, पॉप्युलर प्रकाशन

Summary of Prathamesh Date, Ichalkaranji

(A journey from a boy with Down syndrome’s to a fully grown up professional)

Reality : संदीप खरे यांची कविता----

आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार..... .
आमची प्रेरणा
आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार ,
घरादाराच्य ा चिंधड्या होणार,
सरकार किती परदेशी गेले ते शोधणार,
रिक्षावाले गेले याचा विसर
पडलेला असणार ,
अमेरिका संध्याकाळी निषेध करणार ,
सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे
विकलेली असणार ,
इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख
चित्रपट काढणार ,
'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार,
बाहेर जोड्यांसाठ ी मंत्री उभे असणार ,
पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय
रे देवा !
आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ
मराठवाडा होरपळून निघणार,
आबा रडायला लागणार, शिंदे हसतच
राहणार ,
चव्हाण-ठाक रे दिल्लीला जाऊन निर्णय
घेणार ,
'हे' वाघावर तर 'ते' इंजिनावर स्वार
होणार ,
आमटे , बंग वेड्यागत अनवाणीच धावणार ,
जाणते साहेब मात्र लवासात स्विमिंग पूल
उभारणार , काय रे देवा !
आता पुन्हा निवडणुका होणार,
काळा पैसा सगळा बाहेर पडणार,
यांना जिजाऊ तर
त्यांना दादोजी आठवणार ,
मातोश्री गरजणार, कृष्णकुंज आदेश देणार,
बाई 'झंझावाती' रोड शो करणार,
उनाड च्यानेल्स बोकाळणार ,
अण्णा उपोषण करणार,
कुणा कुणाचा 'स्वाभिमान '
जागा होणार,
निवडणुकीची सुट्टी म्हणून आम्ही मात्र
खंडाळ्याला जाणार, काय रे देवा !
आता पुन्हा अप्रेझल होणार , जो तो बॉस
ला शिव्या देणार
बॉस त्याच्या बॉस च्या नावाने खडे
फोडत असणार
कंपनी मात्र कागदावर तोटाच दाखवत
राहणार
किती टक्के हाच महत्वाचा प्रश्न होऊन
राहणार
पंधरा नाही तर दहा तरी द्या असे
लाचार स्वर निघणार
'थाळात' मात्र एक टन उस ९० लाच
तुटणार, काय रे देवा !
तळटीपा :
१. 'थाळ' - ऊस तोडणीचे स्थळ
२. तोडणी मजुराला ९० रुपये टन
हा अगदी अलीकडचा खरा भाव आहे
३. घटना व पात्रे खरे आहेत - योगायोग
नाही

कलोजस (संदीप खरे)

स्टेशनबाहेर पडून घरापाशी आलो. बिल्डिंगच्या खाली एक मिनिट शांत उभा राहिलो. नेहमीसारखंच दिवसाच्या अफाट वेगानं गरगरल्यासारखं झालं होतं. दिवसभरातले दबक्‍या संतापाचे, धुसफुशीचे, अस्तित्वहीनतेचे क्षण डोळ्यांसमोर येत होते. काय माझं नाव? काय माझी ओळख? काय माझे छंद? काय माझी अभिरुची? कोण मी? स्वतःविषयी सारी उमेद, आत्मविश्‍वास गर्दीच्या पावलांखाली चिरडून गेली होती.

घरातून बाहेर पडलो आणि हजारातला एक होऊन चाकरीच्या दिशेने चालू लागलो. रस्त्यावरच्या एका डबक्‍यातून एक कार भरधाव वेगानं निघून गेली आणि माझ्या पॅंटवर त्या चिखलाच्या पाण्याचे काही शिंतोडे उडवून गेली! काही कळायच्या आत पुढच्या वळणावरून दिसेनाशीही झाली. ना दाद; ना फिर्याद! तसाच रेटून चालत राहिलो. संतापाच्या तंद्रीत कुठल्या तरी वाहनासमोर जरासा रेंगाळलो, तोच त्या कारनं कर्कश हॉर्नचा आवाज, अंगावर कुणी वसकन्‌ ओरडावं, तसा फेकून दिला. दचकून थोडा बाजूला झालो. कारमालकानं जाता जाता तुच्छतेनं माझ्याकडं पाहिलं. "कहॉं कहॉं से आ जाते है साले!' असा त्याचा शेरा कानावर आदळला. पायांना गती दिली आणि वर भरलेल्या आभाळाकडं पाहत, कुठल्याही क्षणी कोसळेल, अशा पावसाची प्रार्थना करत स्टेशनकडे निघालो.
स्टेशनवर नेहमीसारखीच हीऽऽ गर्दी! "डिस्कव्हरी'वर वाळवीची वारुळं दाखवली होती, ती आठवली. एकमेकांना खेटलेली, चिकटलेली, बुजबुजलेली ती वस्ती! आम्हीही तसलेच. स्वतःचंच आयुष्य कुरतडत बसलेल्या वाळव्या. ट्रेन लेट होती. ती तिची वेळ झाली, तेव्हा आली आणि मला पोटात भरून निघाली. आजूबाजूला माणसंच माणसं. छोटे, मोठे, कर्कश, किनरे, भसाडे आवाज. शिंका, उचक्‍या, खोकले, मानेवर आदळणारे श्‍वासोच्छ्वास. माझे हात-पाय, डोकं, शरीर त्या गर्दीच्या स्वाधीन. तशातच पाऊसमहाराजांचं आगमन झालं आणि दरवाजाजवळ उभे असलेले आम्ही त्या थेंबांनी भिजू लागलो. कपड्यांआत घामाचा ओलावा नि बाहेर पावसाचा.

ईप्सित-स्टेशनावर बाहेर फेकला गेलो आणि छत्री उघडून ऑटो शोधायला लागलो. माझ्या एरियात येण्याचा ऑटोवाल्याला "मूड' नव्हता. त्याच्या हाता-पाया पडून, जास्त पैशाची लालूच दाखवून एकदाच्या त्याच्या रिक्षेत बसलो आणि त्याच्या गुर्मीदार उपकाराचं ओझं पाठीवर घेऊन ऑफिसात पोचलो.
आल्यावर बॉसच्या केबिनमध्ये उशिरा येणे, कामातली इफिशिअन्सी, पेंडिंग जॉबविषयी खेटरे खाणे इत्यादी बौद्धिकं, परिसंवाद उरकून अनेक खुर्च्यांपैकी एका खुर्चीत बसून कामाला प्रारंभ केला. कॉम्प्युटर बडवला. फायली उरकल्या. भेटायला आलेल्या क्‍लाएंट्‌सचे प्रश्‍न, खोचक तिरकस शेरे, संताप, समजावणी हे सोपस्कार उरकले. मध्ये डब्यातली गार भाजी-पोळी संपवली. चहाचे कप रिचवले. ऑफिसमधल्या दिवसाचा रकाना भरला आणि पुन्हा एकदा अफाट गर्दीतला एक कण होऊन ट्रेनमधून घरी निघालो. स्टेशनबाहेर पडून घरापाशी आलो. बिल्डिंगच्या खाली एक मिनिट शांत उभा राहिलो. नेहमीसारखंच दिवसाच्या अफाट वेगानं गरगरल्यासारखं झालं होतं. दिवसभरातले दबक्‍या संतापाचे, धुसफुशीचे, अस्तित्वहीनतेचे क्षण डोळ्यांसमोर येत होते. काय माझं नाव? काय माझी ओळख? काय माझे छंद? काय माझी अभिरुची? कोण मी? स्वतःविषयी सारी उमेद, आत्मविश्‍वास गर्दीच्या पावलांखाली चिरडून गेली होती.
एक बधीर अनोळखी शरीर, अस्तित्व घेऊन दाराची बेल वाजवली आणि दार उघडताक्षणी "बाबा, बाबा' करत चिमुकलीचे रेशमी हात गळ्यात पडले. आत काहीतरी थरारलं. काहीतरी सजीव झालं. "बाबा, आज की नाही शाळेत काय झालं..', "बाबा, मला खांद्यावर बसव', "आमच्या टीचरनी निबंध सांगितलाय, तो दे ना लिहून...', आणि हे सारं तृप्त कौतुकानं पाहणारे माझ्या बायकोचे डोळे!

"अगं थांब पिलू, बाबा आत्ताच आलाय ना ऑफिसमधून...दमलाय बघ किती...त्याला पाणी दे आधी!' अशी तिची लगबग. हातात अलगद आलेला गरमागरम चहाचा कप! क्षणांच्या मागे एकदम एक मंद, सुरेल पार्श्‍वसंगीत सुरू झालं. बायकोचं लडिवाळ आर्जव..."अहो, आ आठवड्यात वेळ काढा हं...आई-बाबा म्हणत होते बरेच दिवसांत जावईबापू आले नाहीत जेवायला!'

मुलीला निबंध लिहायला चार वाक्‍यं सांगितली तर "आई ।।, बाबा कसला ग्रेट आहे. दहा मिनिटांत निबंध दिला,' असं सर्टिफिकेट हातात आलं! ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, ती चूल पेटली आणि अन्नब्रह्माची ती ऊब डोळ्यांवर छान पेंग आणू लागली! आणि रात्रीच्या अंधारात पाठीवर अलगद मायेचा हात फिरला, "किती धावपळ करतोस रे आमच्यासाठी...दमलं का माझं बछडं!!'

थकल्या शरीराला पुढल्या दिवसासाठी बळ आलं. माझी "गरज' असलेले हे जिवलग, माझे आप्त, माझे सुहृद! माझी "ओळख' असलेली ही माझी माणसं, माझं जग, माझी आकाशगंगा! अंतरात लीन-दीन, ओळखशून्य, मावळलेला सूर्य पुन्हा पूर्वेकडं झेपावला...एका नव्या दिवसाच्या प्रारंभासाठी!

कलोजस
तो टीव्हीवर असतो
तेव्हा कोणीच नसतो,
अस्तित्वाच्या फांदीला लोंबणारा
चुरगळलेला मांसाचा
कंटाळलेल्या अस्थीचा
एक सांगाडा घामेजलेला,
गर्दीची गती अंगावर घेऊन
वहात जातो निर्जीवपणाने
कुर्ल्याकडे,
सांडपाण्यातील किड्यासारखा,
व्यक्तित्वहीन.
पण कुर्ल्यातील सिंगल रूममध्ये येऊन
चटईवर, चौपाईवर मरून
तो जेव्हा पुन्हा उठून बसतो
दिवेलागणीच्या प्रकाशात,
तेव्हा तो झालेला असतो
एक प्रचंड कलोजस
बाप
भाऊ
नवरा...
पेटलेल्या चुलीचा स्वामी,
छताला टांगलेल्या दिव्याचा
रखवालदार,
अस्तित्वाचे अठरा लगाम
सांभाळणारा,
अठरा सोनेरी अश्‍वांच्या पाठीवर
आसूड ओढीत
आपल्या ग्रहमालेचा परिवार
जीवनाच्या अंतराळात
मिरवीत नेणारा एक
साक्षात्‌ सूर्यनारायण!

- कुसुमाग्रज
("प्रवासी पक्षी' या काव्यसंग्रहातून)

Why Marathi Radio???

Friends, I recently started commuting Mon-Fri for an out-of-town job. Upon taking this new job, I did couple of things - got myself an iPhone and purchased Marathi Radio app. Now it is desi music - anytime, anywhere... and that takes me back home when I'm away from home... That's why...

marathi radio

All The Best to marathi radio.

Dhamadhikari Vyakhan

Last Sunday June 26th while checking Marathi radio for Marathi songs, came across Darmadhikari Vyakhan. This was enlighting and wonderful information about current crises in Maharashtra. I was amazed to find out how ignorant we as Maharastrians are when comes what our Sachivalaya does for Maharastrian.

Wish there was a audio format of Kas Kay Patil bar hay Ka by Avinath Dharmadhikari

तळ्याकाठी (संदीप खरे)

अनेकदा तुकोबा "भंडाऱ्या'वर जाऊन बसायचे. ते केवळ घरात बायका-पोरांची कटकट होते एवढ्यासाठीच? "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणताना ते लिहितात ः "तुका म्हणे होय । मनाशी संवाद। आपुलाचि वाद । आपणासि।।' अवघ्या काही शब्दांत साऱ्या विजनवासाचं नेमकं इंगित ! विचार केल्यावर जाणवतं- खरंच कुठं आहे हा मनाशी संवाद? स्वतःमधलं खरं-खोटं तपासणारा हा अगदी मोकळ्या मनानं केलेला "आपुलाचि वाद आपणासि' आहे तरी कुठं?

काय अवस्था करून घेतल्येय ना आपण स्वतःची! प्रगती, संपत्ती, स्पर्धा यांतून ही सिमेंट-कॉंक्रिटची जंगलं उभी राहिली केवळ आणि आपण त्यात भरकटलेले सारेजण! कानावर कुठला आवाज नाही, असा एक क्षण जात नाही; मग ती पहाट असो, सकाळ-दुपार असो वा मध्यरात्र! रहदारीचे आवाज, विनाकारण आणि अखंड वाजविल्या जाणाऱ्या हॉर्न्सचे आवाज, घरातल्या रेडिओ-टीव्हीचे आवाज, उत्सवांमध्ये, प्रत्येक जयंती-मयंतीला उभ्या राहणाऱ्या लाउडस्पीकरच्या भिंतींचे आवाज, प्रचारांचे आवाज, स्वतःचं प्रदर्शन मांडणाऱ्या भक्तीचे, उपासनांचे आवाज...आणि हे सारं काही कमी म्हणून अगदी झोपेतही मनात, मेंदूत चालू असलेल्या कल्लोळांचे अखंड आवाज.

असं वाटतं की, जगण्याचाही एखादा रिमोट कंट्रोल असायला हवा होता. कोलाहलामध्ये भिरभिरून जायला झालं की, थोडा वेळ का होईना, पण त्यातलं "पॉज'चं बटण दाबावं!

माझ्या मते हे "पॉज'चं बटण म्हणजेच कवी अनिलांची ही आजची कविता! दहा ओळींमध्ये एका तळ्याच्या काठावरचं हे स्केच! हे स्केच खरं तर त्या गोष्टीचं नाही. तिथल्या शांततेचं, वातावरणाचं आहे. इथं शांतता स्वतःच थकून निवाऱ्याला येते, गळणारं पान सळसळ आवाज करत नाही, मासळीसुद्धा उसळीचा नाद होऊ देत नाही आणि बगळा एका पायावर एखाद्या हटयोग्यासारखा निःसंग उभा आहे! हा पॉज आहे! दृश्‍यं दिसतायत, आवाज गायब आहे. सारं काही निवळशंख दिसतंय. हे असंच्या असं टिपायचं, यात मिसळायचं तर इथं श्‍वासांचा आवाज होऊ द्यायचा नाही. इतकंच काय, हालचालींचा, अगदी उघड-मीट करणाऱ्या पापण्यांचाही आवाज होऊ द्यायचा नाही! इथं नुसतं असायचं आहे!

सुरवातीला तर अगदी विचित्र वाटेल...सवयच नाही ना अशा शून्य शांततेची...आणि मग थोडासा कंटाळा...मग कदाचित मूर्खपणाच वाटू लागेल..."काय हे...नुसतं वेड्यासारखं बसलोय आपण! वेळ चाललाय फुकट...सेकंदांचे पैशात, यशात रूपातर होत नाहीए!' भीतीसुद्धा वाटेल...पण अगदी काहीच वेळ...! जळाआतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून जावा, तशी ही शांतता लपेटून घेईल! सगळे विचार ः कालचे, आजचे, उद्याचे, घराचे, ऑफिसचे, राजकारणाचे, समाजाचे, अगदी सगळे सगळे विचार धुळीसारखे हळूहळू खाली बसू लागतील! असं वाटू लागेल की, अगदी जन्मापासून डोक्‍यावर असलेलं विचारांचं, आवाजांचं, काळाचं ओझं कुणी खाली उतरवून ठेवलं आहे!
हे असं काही होण्यासाठीच आपण पिकनिकला, आउटिंगला जात असू का? पण तिथं गेल्यावरही जंगलात, गड-किल्ल्यांवर मोठमोठ्यानं रेडिओ लावण्याची, गोंगाटाची कशी ही तऱ्हा आपली! त्यापेक्षा अशा एखाद्या तळ्याकाठी बसलं तर?! जिथं आनंद बाहेरून पकडायचा, कमवायचा नाही; तर आपल्याच आतलं दार उघडून त्याला आपल्या आतूनच मोकळं होऊ द्यायचं आहे! हलकं हलकं व्हायचं आहे...

मग कुणास ठाऊक काय काय होईल...शांततेच्या या तळ्यात बसून राहताना आतूनच काही अभावितपणे उमलू लागेल! नाद, स्पर्श, रूप, गंध, चव यांचे खरे खरे अर्थ कदाचित आकळू लागतील. चकवा लागलेले पाय "ज्या जागी तू उभा आहेस, तिथंच "तू आहेस', असं सांगू लागतील आणि जन्मभर काहीतरी शोधत राहण्याची, वणवण करण्याची आसक्ती, सारा प्रवास त्या क्षणीच थांबून जाईल! आणि मग कदाचित पाखरं गातात; तितक्‍या सहजपणे गळ्यात गाणं येईल, वाऱ्याइतके नैसर्गिकपणे श्‍वास येऊ-जाऊ लागतील, मजेत डुलणाऱ्या लता-वेलींसारखी आयुष्याची लय सापडेल; अंगात भिनेल. शब्दावाचून स्वतःशी इतकं प्रामाणिक, नितळ बोलताना "शब्दांच्या पलीकडले' काही प्रकाशेल आणि "अरे अरे ज्ञाना झालासि पावन'चा घोष आनंदविभोर होऊन मनात उसळू लागेल!

शांततेच्या गर्भातून अवतरलेल्या शब्दांच्या मग "गाथा' होतील आणि पाहता पाहता "तुकोबा'चा "विठोबा' होऊन जाईल...! अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसलेला "मी' मला पाहायचा आहे फार फार दिवसांपासून...नव्हे; कदाचित फार फार जन्मांपासून!

लाकूडतोडयाचा मुलगा !

लाकूडतोड्याचा मुंबईतला मुलगा प्रथमच बायकोला घेउन गावी आला होता.
ज्या विहीरीत कु-हाड पडल्यामुळे सासर्याचा भाग्योदय झाला ती विहीर बघायची तिला फार ईच्छा होती.
'अय्या किती खोल आहे 'असे म्हणत असतानाच तोल जाउन ती विहीरीत पडते.
आता देवाचा धावा करण्याची पाळी लाकूडतोड्याच्या मुलाची असते !
देव तत्परतेने बिपाशा बसूला बाहेर काढतो आणि ही का तुझी बायको ? असे विचारतो.
लाकूडतोड्याचा मुलगी आधी हो मग नाही मग परत हो अशा अर्थाने माना हलवत राहतो व शेवटी निर्धाराने "हो" म्हणून सांगतो !
देव संतापून म्हणतो, कलीयुग म्हणतात ते हेच !
कोठे तुझा बाप आणि कोठे तू, या Item girl ला आपली बायको म्हणून सांगतोस !